अक्षय तृतीया

Spread the love

अक्षय तृतीया ही तिथी विशेष का आहे?

हिंदू धर्मात या तिथीला विशेष असे महत्त्व आहे. कारण याच्या नावातच “अक्षय” हा शब्द आलेला आहे. याचा अर्थ कधीही क्षय/नाश न होणारा. म्हणजेच त्या दिवशी जे आपण दान करू, जप करू, दुसऱ्यांना सहकार्य, मदत करू अशा ह्या सर्वच चांगल्या कर्माचा कधीच क्षय म्हणजे नाश होणार नाही.

             जैन धर्मातही हिंदू धर्माप्रमाणेच या दिवसाचे महत्त्व आहे. मान्यता आहे की याच दिवशी भगवान आदिनाथ यांनी आपली तपस्या समाप्त केली होती. आणि पहिला आहार म्हणजे उसाचा रस घेतला होता. तो दिवस अक्षय तृतीयेचाच होता. या दिवशी जैनधर्मीय लोक अन्न-धान्य, आहार व फळे दान करतात. तसेच ज्ञानाचे दान करतात. औषधीचे दान करतात. या दिवशी व्रत ठेवतात आणि पूजापाठ सुद्धा करतात. या अक्षय तृतीयेलाच “आखातीज” असेही म्हटले जाते.

पौराणिक मान्यता

1.हाच दिवस पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी त्यांची मनोभावे पूजा केली जाते.

2.पृथ्वीचे पालनकरता “भगवानविष्णू” व “मातामहालक्ष्मी” यांची आज मनोभावे पूजा केली जाते. त्यांना पांढऱ्या फुलांचा हार, गोकर्णीचे फुले तसेच पिवळी,पांढरी व लाल फुले अर्पण केली जातात. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी समर्पणाचा भाव आज मनामध्ये ठेवल्या जातो.

3.याच दिवशी सतयुग,त्रेतायुगआणि द्वापरयुग या सर्व युगांची सुरुवात झाली असे मानले जाते.

4.याच दिवशी भगवान परशुराम यांची जयंती असते. भगवान परशुराम हे श्रीविष्णूचेच अवतार रूप आहे.

5.याच दिवशी पांडव वनात जात असताना, भगवान श्रीकृष्णाने “अक्षय-पात्र” द्रौपदीला दिले होते. असे म्हटले जाते की त्या अक्षय पत्रातून जे हवे व जितके हवे, तितके वेळा मिळत राहायचे. या पात्रामुळेच द्रौपदी दुर्वास ऋषींना प्रसन्न करू शकली.

दुर्वास ऋषी हे अत्यंत क्रोधी म्हणून पुराणात प्रसिद्ध आहेत.

6.”माता अन्नपूर्णे”ची पूजा आजच्या दिवशी मनोभावे केल्या जाते. ज्यामुळे आपल्याही जीवनात कधीच अन्नधान्याची कमी होत नाही. अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धनधान्य समृद्धी आपल्या घरात भरपूर असते.

7.नर-नारायण आणि हयग्रीव यांचा सुद्धा अवतार याच दिवशी पृथ्वीवर अवतरित झाला होता.

8.याच दिवशी श्रीकृष्णाचा “मित्र-सुदामा” त्यांना भेटायला आला होता. अशा प्रकारे मित्र प्रेमाचा व मित्र भेटीचा हा दिवस आहे.

9.आधुनिक काळातही याच दिवशी बद्रीनाथ आणि केदारनाथचे पट खोलण्यात येतात. आणि याच दिवशी भगवान बाकी बिहारी यांच्या चरणांचे दर्शन घेतल्या जाते. बाकी वर्षभर ते वस्त्राने झाकलेले असते.

        बहुतेक सर्वच ठिकाणी या दिवशी सोने खरेदी करतात. कोणी गाडी खरेदी करतात.घर, फ्लॅट, प्लॉटचे बुकिंग या 9दिवशी करण्यात येते किंवा खरेदी करण्यात येते. या दिवशी पूर्वजांची कृपा प्राप्त करण्यासाठी म्हणजे “पितृ-कृपा” मिळण्यासाठी “पितृ-स्तुती” करायची असते. तसेच पूजा पण करायचे असते.

तिथी कधी आहे?

ही तिथी हिंदू पंचांग नुसार 29 तारखेला पाच वाजून 29 मिनिटांनी सुरू होत आहे. व 30 तारखेला दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत संपन्न होत आहे. सर्व बारा महिन्यातील शुक्लपक्ष तृतीया शुभ असल्या तरी ह्या वैशाख महिन्या ची अक्षय तृतीयेची तिथी स्वयंभू शुभ मानली जाते. या दिवशी परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगांचा आपल्या मनस्थितीवर व उर्जेवर प्रभाव पडतो. व केलेल्या चांगल्या कर्माचाही अक्षय भाग आपल्या जीवनाला मिळतो. आपल्या व आपल्या पूर्वजांच्या जीवनात सुख-समृद्धी यावी म्हणून आजच्या दिवशी पूजा व दानधर्म याची विशेष काळजी घेतल्या जाते. त्यातून आपल्याला शक्ती व प्रेम मिळते.

अक्षय तृतीयेला पूर्वजांची पूजा कशी करावी?

अक्षय तृतीयेची पूजा पूर्वजांना “समर्पित” आहे. यासाठी बाजारातून दोन एक छोटा एक मोठा असे माठ आणावे लागतात. मोठ्या माठ म्हणजे केळी व छोटा माठ म्हणजे करा, असे त्यांना म्हटले जाते. असे दोन माठ विकत घ्यायचे असतात. सर्वप्रथम त्यांना स्वच्छ करून त्यावर चंदनाने वरून खाली अशा बोटाने पाच रेषा ओढतात व तीन वेळा गुंडाळून कलावा बांधतात. माठांना गळ्यापर्यंत जलाने भरायचे असते. नंतर त्यात अक्षद, सुगंधीफुल व एक रुपयाचे नाणे ठेवायचे असते. भारतात काही ठिकाणी केळी व करा वर डांगर ठेवतात तर काही ठिकाणी आंबा केळीमध्ये ठेवतात. अशाप्रकारे दोन-तीन पिढ्यांचे प्रतीक मानून पूजा केली जाते. या पूजेमधून सकारात्मक ऊर्जा संपूर्ण कुटुंबाला मिळते.

मुहूर्त:

भारतीय परंपरेत मानल्या गेलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीयेचा मुहूर्त अतिशय “पवित्र” मानले जाते. हा मुहूर्त “अभिजीत मुहूर्त” म्हणून प्रसिद्ध आहे. यावर्षी बुधवारी अक्षय तृतीया आल्यामुळे बुधवार हा “विघ्नहर-

  गणेशाचा” दिवस आहे. शिवाय “रोहिणी” नक्षत्रावर अक्षय तृतीया आली असल्यामुळे हा अत्यंत दुर्लभ असा संयोग आहे. त्यामुळेच या पवित्र दिवशी पितरांसाठी,तर्पण,पिंडदान व जलदान केल्यास त्यांच्याही आत्म्याला शांती मिळते. अशी श्रद्धा आहे. या दिवशी सूर्य व चंद्र हे दोन्हीही आपापल्या उच्च राशीमध्ये विराजमान असतात.

हवन:

              या दिवशी छोटेसे हवन करावे. त्याला “आगारी” असे सुद्धा म्हणतात. प्रथम एक गोमातेच्या शेणाची गोवरी घेऊन वाढलेली गोरी घेऊन त्यावर तूप टाकावे त्यावर एक कापूरवाडी ठेवावी व नैवेद्यातील एकेक घास आगारीत हळूहळू टाकावे. अशा प्रकारे पूर्वजांसाठी “हवन” करावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्य आणि चंद्र हे दोन्ही ग्रह स्वतःच्या उच्चतम राशीमध्ये विराजमान असतात. असा हा “दुर्लभ-संयोग” या दिवशी असतो.

आणखी एका पौराणिक कथेनुसार, त्रेतायुगाच्या प्रारंभी म्हणजे,आजच्याच दिवशी, हिंदू धर्मात सर्वात “पवित्र” मानली जाणारी “गंगा” नदी पृथ्वीवर राजा भगीरथाने याच दिवशी आणली होती. त्यामुळे आजच्या पूजेत गंगाजलाचेही महत्त्व आहे.

म्हणजे केळी व करा मध्ये थोडे गंगाजलही टाकल्या जाते ज्यामुळे “पितरांच्या-आत्म्यांना” शांती मिळते.


Spread the love

Leave a Comment

Recommended
भाषा करो अपनी भाषा पर प्यार।जिसके बिना मूक रहते तुम,…
Cresta Posts Box by CP
Index