चाणक्य नीति
प्रथम अध्याय
ईश्वर प्रार्थना
प्रणम्य शिरसा विष्णु त्रैलोक्याधिपतिं प्रभुम्।
नाना शास्त्रोद्धतं वक्ष्ये राजनीति समुच्चयम ।। 1 ।।
चाणक्य नीति च्या पहिल्या श्लोकाचा अर्थ:-
भगवान विष्णु हे (स्वर्ग, पृथ्वी, पाताळ) अशा तिन्ही लोकांचे स्वामी आहेत. पालनकर्ते आहेत. त्यांच्या – –चरणावर मस्तक टेकवून प्रणाम करून अनेक शास्त्रातून वेचून काढून महान असे की, जे मानवी जिवनाला अतिआवश्यक त्याचे वर्णन येथे करीत आहे. मी कौटिल्य भगवान विष्णुला, मस्तक झुकवून, नत मस्तक करून, वंदन करीत आहे. कुशल अशी ही चाणक्य नीती राजा आणि प्रजा दोघांसाठीही अति उपयुक्त आहे. राजाने प्रजेच्या निर्वाहासाठी (प्रजेसाठी) जो धर्म आहे त्यालाच राजधर्म मानला आहे. हे एक सत्य आहे .चाणक्य कुटनीतित प्रविण होते. निती किंवा नितिमत्ता हाच खरा धर्म आहे. या धर्माचा उपदेश नीतिवचनांच्या स्वरुपात कोणतेही विघ्न न येता पूर्ण व्हावा या अर्थाने प्रारंभीच मंगलचरणांत भगवान विष्णुची आराधना करून कार्यारंभ केलाआहे.
प्रथम अध्याय
चाणक्य नीति च्या पहिल्या अध्यायात दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. चांगला मनुष्य कोण.