गुड फ्रायडे हा दिवस येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचा दिवस आहे. हा ख्रिश्चन धर्मातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. बायमल मध्ये लिहिलेले आहे की, या दिवशी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर चढवून त्यांचा वध करण्यात आला होता. मानवतेसाठी त्यांची सहनशक्ती अफाट होती. आपले बलिदान देऊन त्यांनी जगाला प्रेम, त्याग व माणसाच्या मनातील चांगलेपणा टिकवण्याचा व दया करण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे ख्रिश्चन धर्मात हा दिवस शोक व प्रार्थने चा दिवस म्हणून पाळला जातो.
गुड फ्रायडे अनेक नावांनी ओळखला जातो:
गुड फ्रायडे हा दिवस अनेक नावांनी ओळखला जातो. जसे की, होली फ्रायडे, ब्लॅक फ्रायडे, ग्रेट फ्रायडे. हा गुड फ्रायडे हा दिवस एस्टर संडे च्या आधी येणाऱ्या शुक्रवार ला पाळला जातो. हा एक ईसाई लोकांचा पवित्र पर्व आहे. येशू ख्रिस्त दया, करुणा यांचे प्रतीक आहे.
गुड फ्रायडे हा पर्व का साजरा करतात?
जगातील सर्वांनी, दया, करूणा एकमेकांप्रती ठेवून वागावे हाच उद्देश त्यांनी केला. तसेच आपल्या वागण्याने कोणत्याही व्यक्तीचे नुकसान होणार नाही किंवा त्यांना नुकसान पोहोचणार नाही हा विचार त्यांनी जगाला सांगितला. तसेच नेहमी खरेपणाच्या रस्त्यावर चालायला शिकवले व अन्याय करणाऱ्यांच्या विरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे असेही सांगितले. ह्या दिवशी सर्व ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये एकत्र येऊन हे पर्व मनवतात. सर्व एकत्रित आल्यावर त्यांनी सांगितलेल्या संदेशाची आठवण करून प्रार्थना करतात. व जीवनात त्याप्रमाणे चालावे असे वचन एकमेकांना देतात. पूर्ण विश्वामध्ये म्हणजे विश्वभर मोठ्या धुमधडाक्याने हा दिवस साजरा केला जातो.
सार्वजनिक सुट्टी:
या दिवशी देशांमध्ये, सर्व शाळांना, सर्व महाविद्यालयांना आणि सर्व सरकारी संस्थांना सुट्टी जाहीर केलेली असते. या दिवशी सर्व एकत्रित येऊन शोक प्रगट करतात व मानवतेच्या कल्याणासाठी येशू ख्रिस्ताने जे बलिदान दिले आहे त्याचे स्मरण करून दया प्रेम करण्याची जाणीव बाळगतात व प्रार्थना करतात त्या साठीच या दिवशी सुट्टी असते.
येशू ख्रिस्तांचा उपदेश/ संदेश:
येशू ख्रिस्तांचा जन्म बेथलेहेम मध्ये झाला. ते ईश्वराचे पुत्र होते. त्यांनी धर्माच्या मार्गाने चालण्याचा संदेश सर्वांना दिला व वाईट गोष्टींपासून दूर राहण्याचा उद्देशही केला. मात्र जुलमी राजकीय लोकांना हे आवडले नाहीत त्यामुळे ते येशूच्या उपदेशाला व ईश्वरीय संदेशाला विरोध करू लागलेत. शेवटी त्यांनी खोट्या-नाट्य अफवा पसरवून येशू ख्रिस्तां विरुद्ध वातावरण तयार केले गेले. ह्या अफवा खऱ्या भासविनण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. शेवटी येशू ख्रिस्तांना वधस्तंभावर खिळविण्याचा (म्हणजे हाता पायाला खिळे ठोकून उभे करण्याचा) निर्णय झाला. हाच तो भयंकर दिवस होता. परंतु जगाच्या कल्याणासाठी त्यांनी आपली सहनशक्ती, विचारशक्ती, करुणा, दया, प्रेम या जगात नेहमीसाठी टिकून राहावी म्हणून आपल्या प्राणांचे बलिदान दिले.