।।श्लोक।।श्रीमद् भगवद्गीता (कर्मयोग)

Spread the love

श्रेयान्स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात।
स्वधर्मेनिधनं श्रेय:परधर्मो भयावह:।।

अध्याय तिसरा, श्लोक क्रमांक 35

 ।।भावार्थ।।

मनुष्य ‘कर्म-विना’ एकक्षणही राहू शकत नाही. मग ते कोणत्याही प्रकारचे कर्म असो. जसे, आध्यात्मिककर्म असो, नियतकर्म असो,की भौतिक कर्म असो. म्हणजेच मृत्यूपर्यंत आपले नियतकर्म मनुष्याने करावे. आणि तेही आपल्याच धर्मात राहून करावे.आणि हे करत असताना आपल्याच धर्मात मरावे.हेच श्रेयस्कर ठरते. त्यानेच आपल्या जीवनाचे जिवंतपणी व मेल्यानंतरही कल्याण होते. मात्र दुसऱ्याच्या धर्मासाठी कर्म करणे व मरणे हे भय देणारे असते.

 थोडक्यात स्वधर्मात राहून आपलं स्वतःचं कर्तव्य करावे.भलेही ते अपूर्ण राहो, पण प्रयत्न करावा. इतरांच्या कर्तव्यात,धर्मात पूर्ण असले तरी कर्म करू नये,ते आपल्या स्वतःसाठी म्हणजे आपल्या “आत्म्या”साठी कल्याणकारी ठरत नाही.


Spread the love

Leave a Comment

Recommended
श्लोक ।। साहित्यसंगित् कला विहीन:l   साक्षात्पशु: पुच्छविषाणहीन:।।तृणं न खाद्न्नपि जीवमान:।   तद् भागें…
Cresta Posts Box by CP
Index