एकदा इसाप यात्रेसाठी झांथस बरोबर होता. देवदर्शनाला जाणाऱ्या भक्तांची तेथे खूपच जास्त गर्दी झाली होती. मंदिराकडे जाणारा बोळ अगदीच अरुंद होता. बोळात एक भला मोठा दगड पडलेला होता. सारे लोक त्या गर्दीत दगडामुळे ठेचकाळत, कधी पडत, तो दगड ओलांडून जात होते. पण त्या दगडाला कोण पाहणार! कोण त्याला उचलून बाजूला करणार! शेवटी ती गोष्ट झाथसच्या लक्षात आली. तेव्हा त्याने तो उचलून बाजूला ठेवला आणि रस्ता साफ केला. तेव्हा इसाप म्हणाला, मालक या यात्रेत जनावरांची खूप गर्दी झाली आहे. देवदर्शनासाठी फक्त एकच माणूस आला आहे. इसापच्या त्या बोलण्याचा अर्थ समजून,झांथसला खूपच “भूषण” वाटले.
