इसाप

Spread the love

4. झांथस आणि इसाप

झांथस हा तत्ववेता होता. तो नेहमी काहीतरी गूढ विचारात दंग असायचा. संसार आणि व्यवहार याकडे त्याचे लक्ष राहत नसे. तत्त्वज्ञानात तो सतत गढून  असायचा. त्यामुळे त्याची बायको त्याच्यासोबत भांडण करीत असे. त्यामुळे त्याची बायको त्याच्यावर खूप रागवायची, संतापायची. वैतागून आणखी आणखी चिडायची!

             एकदा तर ती रागाच्या भरात माहेरी निघून गेली.  जाताना ओरडत म्हणाली, “मी आता या घरी परत येणारच नाही! चालू द्या तुमचे दोघांचे तत्त्वज्ञान!” आणखी बरेच वाटेल ते बोलली. तरीपण झांथस अतिशय शांतपणे आपल्या विचारात गढून होता. त्याचे तिच्याकडे लक्षच नव्हते,तो आपला नेहमीप्रमाणे शांत आणि गंभीर होता.

                झांथसच्या पत्नीला माहेरी जाऊन आठ-दहा दिवस झाले. आता मात्र झाथस अतिशय अस्वस्थ झाला होता. धन्याची ती.  

        स्थिती पाहून इसाप म्हणाला, “मालक! मी मालकिणीला परत घेऊन येऊ काय?” “छे, छे, ती मुळीच येणार नाही! ती भारीच हेकेखोर आहे!  रागीट आहे!” असे पुढे झांथस सुस्कारा सोडून म्हणाला. पण इसाप करारी होता. तो म्हणाला, “मी काय वाटेल ते करीन; पण बाई साहेबांना इथं घेऊन येईन” “बघा!मी बाईसाहेबांना इथं आणीनच!” असे तो म्हणाला!

     मग इसापने एक युक्ती केली.झांथससाहेब आता दुसरे लग्न करणार आहेत,”अशी अफवा सर्वत्र त्याने पसरविली. त्याने  धान्याच्या व्यापाऱ्यांना सांगितले, कापड दुकानदारांना पण सांगितले, दूधवाले, वाजंत्री, आचारी या सगळ्या लोकांशी त्याने मालकाच्या दुसऱ्या लग्नासमारंभाविषयी चर्चा केली.

                  हां हां  म्हणता ती वार्ता झांथसच्या बायकोच्या कानापर्यंत गेली. तिला समजले की, झांथस आता दुसरे लग्न करणार आहे.”मी उगीचच, घरातून बाहेर रागावून निघाले.ती भयंकर स्वतःवरच संतापली”,आणि तातडीने सासरी परत आली.तिने माहेराहून गाडीभर मौल्यवान सामान आणले. व तावातावाने झांथस वरओरडून म्हणाली,

         “हा घ्या तुम्हाला आहेर! तुम्ही मला टाकून दुसरे लग्न कसे करणार बघतेच!करणार ना! पण मी बरी सुटेल! तुम्हाला मी कधीच सोडणार नाही! तुम्हाला दुसरे लग्न करू देणार नाही. खबरदार! ऐकून घ्या पटकन!

           तिचे, चमत्कारी बोलणे ऐकून झांथस चकितच झाला. नंतर त्याला कळले, “मालकिणीला परत आणण्यासाठी इसापने काय युक्ती केली होती, पण ती युक्ती त्याला पटली”. तो खो-खो हसत त्या कजाग बायकोला म्हणाला, “अगं! हे सारं नाटक आहे! आपल्या इसाब ने आपली थोडी गंमत केली. आता तू राहणार ना इथेच? तुझ्याशिवाय माझं तत्त्वज्ञान शून्यच आहे!” नंतर ती सगळे आनंदाने राहू लागली. आता इसाप त्यांचा आवडता बनला होता.

            झांथसची बायको माहेराहून परत आली खरी,पण तिचा “मूळस्वभाव” कायमच होता. थोडे दिवस ती चांगली राहिली.अतिशय आनंदात राहिली. मात्र पुढे पुढे दररोज ती पुन:पुन: रागवायची,संतापाची.परत परत खूप टाकून झांथसला बोलायची. आता मात्र इसापला फार वाईट वाटले.

तिचा स्वभाव बदलण्यासाठी इसापने आणखी एक युक्ती केली.

एके दिवशी जेवणाच्यावेळी इसापने मालकाच्या पाना शेजारी आणखी एक पान वाढले.“हे पान कोणासाठी वाढलं रे?”मालकिणीने विचारले.

        इसाप म्हणाला, “मालकांचा एक हितचिंतक आणि विश्वासू व आवडता असा स्नेही इथे जेवायला बसणार आहे!”थोड्याच वेळात इसापने  धन्याचा कुत्रा आणून त्या पानावर बसविला, तेव्हा मालकिण म्हणाली, “हाच तो हितचिंतक, विश्वासू आणि आवडता मित्र आहे का? तुमच्या मालकाचा? एक कुत्रा?” त्यावर इसाप म्हणाला, “बाईसाहेब,प्रामाणिकपणे सांगतो,वास्तविक तुम्हीच माझ्या मालकाच्या खऱ्या हितचिंतक आहात; पण तुम्ही त्यांच्याशी प्रत्येक गोष्टत रागावून बोलता. भांडण करून करून सांगता! ते तेच तुम्ही जर…………” “पुरे पुरे, कळलं! इसाप आज तू माझे चांगले डोळे उघडलेस.” असे म्हणून तिने, आपला डोक्यातला राग गिळला. मनापासून सांगितले की मी, “आज पासून राग कायमचा सोडणार आहे. माझा स्वभाव बदलून आता मी माझ्या नवऱ्याशी प्रेमाने वागेल. त्याच्यावर कधी चिडणार नाही.”

         त्यानंतर ती खरंच नवऱ्याशी प्रेमाने वागू लागली.

5.मालक आणि त्याचा मित्र

एके दिवशी झांथसच्या घरी मित्रमंडळींना मेजवानी होती.री तयारी करून इसाप स्वस्थपणे लोकांची वाट पाहत होता. तो अंगणात झांथसच्या मुलाबरोबर खेळत बसला होता. इतक्यात झांथसचा एक तत्त्ववेत्ता मित्र आला. तो इसापला म्हणाला, “काय रे इसाप, तू तर चांगला शहाणा आहेस आणि तू या लहानशा मुलाबरोबर खेळतोस?” त्यावर इसापने हातातील, धनुकाली त्या तत्त्ववेत्याला दाखविली आणि विचारले, “महाराज या धनुकलीच्या(छोटे धनुष्य)

 दोन्ही टोकांना दोरी सतत बांधून ठेवली तर ती लवकरच मोडेल; पण ही दोरी काही वेळ सोडून ठेवली तर या धनुकलीचा ताठपणा कायम राहून ती सतत चांगलं काम देईल नाही का?”

                    ते ऐकून तो तत्ववेत्ता मित्र क्षणभर गोंधळून गेला. मग इसाप पुन्हा त्यांना म्हणाला,”माणसाचंही असंच आहे. बुद्धीला सतत ताण देण्यापेक्षा थोडा वेळ विरंगुळा म्हणून माणसानं मोकळेपणानं लहान मुलांशी खेळावं, हसावं! नाचावं! नुसतं गंभीर राहणं चांगलं नाही! पटलं ना हे?” 

                 इसापच्या चातुर्याचे त्या तत्त्ववेत्या मित्रांनी खरोखर कौतुक केले. आणि माणसाच्या मनाला थोडा वेळ विरंगुळा हवा हेही मान्य केले.

आता घरात मेजवानी सुरू झाली होती मित्रमंडळींनी खूप खाल्ले आणि मग सारेजण दारू ही प्यायले, दारूच्या धुंदीत ते खूप बडबडू करू लागले. झांथस  म्हणाला,”जेवण मस्त झाले, मी आता समुद्र पिऊनच दाखवतो.” अरे वा! आणि नाही प्यायला तर, मित्राने विचारले? झांथस म्हणाला,आणि नाही पाहिलं तर माझे घरदार मी तुला देईन?” “ठरले” मित्र म्हणाला, “हो नक्की ठरले!” झांथस पण म्हणाला,

 झाले दुसऱ्या दिवशी दारूची धुंदी उतरली. आपल्या बोटातली अंगठी पाहून झांथस मोठा विचारात पडला. “आता काय करणार? आपण पैज हारणार,आपले घरदार मित्राला द्यावे लागणार !आता काय होणार? काय व कसे करावे? बघा! या दारुने केवढा घात होणार!” आता तो मनाशी बोलू लागला. इसाक धन्याच्या उठण्याचीच वाट पाहत होता. तो धन्याजवळ गेला व म्हणाला धनी आता असं करा………..”

इसापने झांथसच्या कानात काहीतरी सांगितले. ते ऐकून झांथसने पटकन टाळी वाजवली.कारण, त्याला ती युक्ती पटली.

                त्या मित्राला घेऊन झांथस समुद्रकाठावर गेला. तेथे त्यांनी समुद्राचे पाणी एका प्यालात घेतले. आणि ठामपणे तो म्हणाला,”हे पहा आपण पैज मारली आहे त्याप्रमाणे, मी आता सारा समुद्र पिऊन टाकणार आहे. पण माझी एक अट आहे. ती अट अगोदर तू पूर्ण केली पाहिजे. तो मित्र म्हणाला, काय”अट” आहे. “ती मी पूर्ण करीन”, या समुद्राला मिळणाऱ्या साऱ्यां नद्या अगोदर बंद करा. आपली फक्त पैज ठरली आहे की मी फक्त समुद्राचे पाणी पिण्याची! नद्यांचे नाही! नाही का? नद्यांचे पाणी तू उद्या बंद कर! मग मी परवा सकाळी लवकरच समुद्र पिऊन दाखवतो.

             ते ऐकून झांथसचा तो मित्र, चकित झाला. “मी उद्या कशा नद्या बंद करणार!” मला ते शक्य नाही!” झाले मित्र शरण आला.झांथसचे संकट टाळले. तो मित्राच्या पैजेतून मोकळा झाला. त्याचे घरदार वाचले.झांथस आनंदी झाला.

            झांथसने आपल्या कानात युक्ती सांगणाऱ्या इसापला धन्यवाद दिलेत.

6. माणसाचा शोध

एके दिवशी दुपारी झांथसची बायको मैत्रिणीकडे भेटीला गेली होती. तिला घरी यायला उशीर लागणार होता. झांथस इसापला म्हणाला,गड्या मला खूप भूक लागली आहे. तू स्वयंपाक कर आणि मला सायंकाळच्या आत जेवायला वाढ.

इसाप संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागला. पण त्याला काड्याची पेटी सापडेना. मग त्याने मेणबत्ती घेतली आणि समोरील घरातून ती पेटवून आणली.वाटेत त्याला एक थट्टेखोर गृहस्थ भेटला व म्हणाला, “दिवसा दिवा घेऊन फिरतो काय? सूर्याला मार्ग दाखवतोस की काय?” असा बोला. मोठा चतुर होता तो गृहस्थाला. त्यावर इसाप चटकन म्हणाला,”हं,हं! बोलू नका, मी माणसाचा शोध घेत आहे!” ते उत्तर ऐकून तो गृहस्थ खजिल झाला,आणि खाली तोंड करून निघून गेला. अशा प्रकारे झांथसच्या घरी इसापचे चातुर्य दाखवणारे कितीतरी प्रसंग “हर-घडी” घडले. अशा अनेक प्रसंगात झांथसला त्याचे भारी कौतुक वाटायचे!

7. कोण कुठे जाणार?

 झांथसच्या सहवासात इसापच्या “दैवी-बुद्धीला” तेज चढत चालले होते. नीती, तत्त्वज्ञान, व्यवहार यामधील कुशलता आणि चतुराई त्याच्या अंगी येत चालली. सूक्ष्मनिरीक्षणामुळे त्याचे ज्ञान वाढत चालले. अडचणीच्या प्रश्नाची उकल तो सध्या व्यवहारी गोष्टी सांगून करू लागला! गोष्टी सांगून तत्व पटवण्याची त्याची हातोटी विलक्षण परिणामकारी होऊ लागली. छान झांथसला इसाप बद्दल आदर वाटू लागला. इसाप फार “हजरजबाबी” होता. 

                        एकदा इसाप रस्त्याने भटकत चालला होता. वाटेतच फौजदार भेटले. ते म्हणाले काय रे! इसाप कुठे चालला आहेस ? त्यावर इसाप म्हणाला,मला काय माहित,मी कुठे चाललो आहे! या उत्तराने फौजदारांना अपमान वाटला. 

ते शिपायांना म्हणाले, घेऊन चला याला ठाण्यामध्ये. त्यावर इसाप म्हणाला, “बघा मी! तुरुंगात जाणार आहे हे मला माहित होतं काय?” “आयुष्यात कोण कुठे जाणार,हे सांगता येत नाही!”

                       इसापच्या या “तात्विक-विचाराचा” फौजदारावर खूपच परिणाम झाला. ते मनात म्हणाले, “खरंच आयुष्यात कोण कुठे जाणार, हे कुणाला सांगता येत नाही! शाब्बास रे इसाप !”नंतर त्यांनी इसापला सही सलामतपणे सोडून दिले.


Spread the love

Leave a Comment

Recommended
प्रतिशोध किसी जन ने किसी से क्लेश पाया नबी के…
Cresta Posts Box by CP
Index