डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे जीवन चरित्र व कार्य
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचे वडील श्री रामजी वल्द मालोजी सपकाळ हे होते. ते सुभेदार पदावर,लष्करी अधिकारी होते. रामजींनी इंग्रजी सैन्याच्या शाळेत शिक्षण घेतले होते. पुढे ते नॉर्मलची परीक्षा उत्तीर्ण झाले. शिक्षण सुरू असताना इसवी सन 1866 च्या सुमारास वयाच्या अठराव्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या 106 सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी एकोणीस वर्षाचे असताना त्यांचा विवाह तेरा वर्षीय भीमाबाईशी झाला. रामजी हे इंग्लिश बोलू शकत. ते नॉर्मल स्कूल (मॅट्रिक) उत्तीर्ण होते. पुढे रामजींनी ब्रिटिश भारतीय सैन्यांमध्ये सुभेदार आणि सैनिकी शिक्षक म्हणून काम केले. रामजी व भीमाबाई या दांपत्याला सण 1891 पर्यंत 14 आपत्ती झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जन्माला आल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम,आनंदराव व भीमराव ही तीन मुले हयात होती. भीमराव हा सर्वात लहान व चौदावे आपत्य होता.
डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे बालपण:
रामजी हे ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुभेदार आणि शिक्षक होते. ते ज्या फलटणीत होते ती फलटण1878 मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर होती,तेथेच सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.या काळात 14 एप्रिल1891 रोजी महू आताचे “आंबेडकरनगर” या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते.

भीमराव हे रामजी सपकाळ व आई भीमाबाई यांचे 14 वे व अंतिम आपत्य होते. बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले. त्यांची भीम,भीमा,भिमराव ही उपनावही प्रचलित झाली.आंबेडकरांचे मुळगाव रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. “आंबडवे” या गावचा “अंबावडे” असा चुकीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे. असा चुकीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे. त्याकाळी गावांमध्ये “स्पृश्य-अस्पृश्य” असे वातावरण होते. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे महाराष्ट्रमधील होते. अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक आर्थिक भेदभाव केला जात असे.
इसवी सन 1894 मध्ये सुभेदार रामजी सपकाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीत परिवारासह राहू लागले.
डॉक्टर बाबासाहेबांचे शिक्षण:
भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे भीमरावांना घरीच अक्षर ओळख करून घ्यावी लागली. इसवी सन 1896 मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले. व ते साताऱ्याला जाऊन राहिले. यावेळी भीमरावांचे वय पाच वर्षाचे झाले होते. अशाप्रकारे प्राथमिक शिक्षण हे दापोली व सातारा येथे त्यांचे झाले. रामजींनी इसवी सन 1896 नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्पस्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावांचे नाव दाखल केले. अशाप्रकारे त्यांच्या जीवनाचा बालपणचा काळ “कबीरपंथी” वडील व धार्मिक व शिस्तबद्ध आई यांच्यामध्ये गेला होता. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीतच इसवी सन 1896 मध्ये मस्तक-शुल या आजाराने आंबेडकरांच्या आई-भीमाबाईंचे निधन झाले. त्यावेळी आंबेडकर पाच वर्षाचे होते. त्यानंतर भीमराव व अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत आनंदाने केले.
1907 मध्ये त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन स्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. यावेळी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला व भेट म्हणून त्यांचे शिक्षक कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी त्यांना “बुद्ध-चरित्र” हा स्वलिखित ग्रंथ भेट म्हणून दिला. त्याच दरम्यान त्यांचा विवाह बाजारातील एका खुल्या शेडमध्ये झाला.भीमरावांनी बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून फेलोशिप मिळाल्यावर 1912 मध्ये मुंबई विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली.संस्कृत शिकण्यास मनाई असल्याने ते “फारशी- भाषा” घेऊन उत्तीर्ण झाले.
कोलंबिया युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका:
त्यांनी बीए पूर्ण केल्यानंतर एमए च्या अध्ययनासाठी सुद्धा बडोदा नरेश सयाजी गायकवाड यांनी पुन्हा त्यांना फेलोशिप दिली. त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी प्रवेश घेतला.1915 मध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यासाठी त्यांनी “कॉमर्स ऑफ पेशंट इंडिया” हा प्रबंध लिहिला त्यानंतर 1915 आणि 1916 मध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी एमए आणि पीएचडी उपाधी प्राप्त केली. ब्रिटिश भारतातील “क्रांती” या विषयाचे “विकेंद्रीकरण” हा संशोधनाचा विषय निवडला. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. तेथे त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे डी. एससी. ची तयारी करण्याची परवानगीही मिळवली. परंतु बडोद्याच्या दिवाणांनी त्यांना भारतात परत बोलावले. नंतर त्यांनी ती पदवी देखील मिळवली. त्यांनी काही काळ जर्मनीतील बॉन विद्यापीठात शिक्षण घेतले.
1916 मध्ये त्यांनी “भारतासाठी राष्ट्रीय लाभांश-एक ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास” हा प्रबंध लिहिला. आणि पीएचडी पदवी मिळवली. आठ वर्षांनी हा प्रबंध ब्रिटिश भारतातील“प्रांतीय वित्त क्रांती” या शीर्षकाखाली प्रकाशित झाला. त्यानंतर ही सर्वोच्च पदवी मिळविल्या नंतर ते भारतात परतले. आणि त्यांना दीर्घकाळ अर्थमंत्री म्हणून तयार करण्याच्या उद्देशाने बडोद्याच्या महाराजांचे“लष्करीसचिव” म्हणून नियुक्त करण्यात आले. परंतु काही काळ शहरात राहिल्यानंतर 1917 पर्यंत ते मुंबईला निघून गेले. अस्पृश्यतेच्या कारणावरून त्यांना अतिशय छळ सहन करावा लागला व त्यामुळे नोकरी सोडावी लागली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य:
1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईत परतले व सीडेन हम कॉलेजमध्ये राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले त्यांचे शिक्षण चांगले असल्याने ते विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते परंतु त्यांनी लंडनमध्ये कायदा व अर्थशास्त्राचे शिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
2. 1924 मध्ये इंग्लंडहून परत आल्यानंतर त्यांनी सर चिमनलाल सेटलवाड आणि डॉ.आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दलित वर्गाच्या कल्याणासाठी एक संघटना सुरू केली. शिक्षणाचा प्रसार करणे, आर्थिक परिस्थिती सुधारणे आणि दलित वर्गाच्या तक्रारींचे प्रतिनिधित्व करणे, हे संघटनेचे तात्काळ उद्दिष्ट होते.
3. दलित वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी 3 एप्रिल 1927 रोजी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले.
4. 1928 मध्ये सरकारी कायदा महाविद्यालयात ते प्राध्यापक झाले. आणि एक जून 1935 मध्ये त्याच महाविद्यालयाचे प्राचार्य झाले आणि 1938 मध्ये राजीनामा देईपर्यंत ते त्या पदावर राहिले.
5. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे दलित वर्गाची प्रांतीय परिषद भरली होती तेव्हा 13 ऑक्टोबर 1935 रोजी त्यांनी हिंदूंना धक्का देऊन घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. त्यांच्या हजारो अनुयायांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला.
6. 1936 मध्ये त्यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी महार परिषदेला संबोधित करून हिंदू धर्माचे त्याग करण्याचे आवाहन केले हा फार महत्त्वाचा निर्णय त्यांच्या जीवनातला होता.
15 ऑगस्ट 1936 रोजी कामगार कल्याणासाठी व त्यांच्या हितासाठी कामगार पक्षाची स्थापना केली. यामध्ये मुख्यत्वे कामगार वर्ग होता.
7. 1938 मध्ये काँग्रेसने अस्पृश्यांचे नाव बदलण्याचे विधेयक मांडले. परंतु डॉक्टर आंबेडकरांनी त्यावर टीका केली,कारण त्यांच्या मते अस्पृश्यांचे नाव बदलणे हा समस्येचा उपाय नाही. तो कधीच होऊ शकत नाही.
8. 1942 मध्ये त्यांची लेबर सदस्य म्हणून भारताच्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेत नियुक्ती झाली.
9. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1947 साली त्यांना नेहरूजींच्या मंत्रिमंडळात कायदा आणि न्याय मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले परंतु 1991 मध्ये त्यांनी काश्मीरप्रश्न व भारताचे परराष्ट्रधोरण आणि हिंदू कोड बिलाबद्दल नेहरूंच्या धोरणावर मतभेद व्यक्त झाल्यामुळे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
10. बाबासाहेबांनी भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. बाबासाहेबांनी फिल्टर नियम कमिशनला सादर केलेल्या संकल्पनेवर मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली.
11. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर मध्ये एका ऐतिहासिक समारंभात त्यांनी “बौद्ध-धर्म” स्वीकारला आणि सहा डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांची पुण्यतिथी देशभरात “महापरिनिर्वाण” दिवस म्हणून पाळले जाते.
Estimated reading time: 5 minutes