16 संस्कारांची माहिती

Spread the love

                   

१६ संस्कार काय आहेत? – सोपी आणि स्पष्ट माहिती

“संस्कार” या शब्दाला जीवनात फार महत्त्व आहे.संस्कार म्हणजे सवयी. सवयी या सर्वच दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. जसे की चांगले विचार, चांगलीशिस्त,नैतिकता,आदर्शमूल्य वआदर्श राहणी.’आदर्श-विचार-संस्कार’ हे एक प्रकारे “नियमित” शिक्षण आहे.

                  “संस्कार” हे केवळ माणसांबरोबरच नाही तर प्राण्यांबद्दल,निसर्गाबद्दल,पर्यावरणाबद्दल नि:स्वार्थ भावना होय.ती कल्याणाची भावना असून, ते कायमस्वरूपी असायला पाहिजे.चांगल्या संस्कारातून आपल्याला इतरांना मदत करण्याची प्रेरणा मिळते. ज्यामुळे आपण समाजाचा विकास साधतो. 

                ह्या सर्व गोष्टी मुलांना लहानपणातच शिकवल्या जातात. त्यामुळे त्यांना चांगले संस्कार मिळतात मनुष्य जीवन जगत असताना समाज जीवनात अथवा कुटुंबात त्याला काही मूल्य पाळावीच लागतात. जेणेकरून मानवाचे स्वतःचे जीवन व इतरांचेही जीवन सुखी होईल. हे सुखी होण्याच्या वागण्याला संस्कार असे म्हटले जाते. यासाठीच (षोडस संस्कार) सोळा संस्कार हिंदू धर्मात आहे.

              मनुष्यांमधील सदगुणांचा विकास होऊन, संवर्धन करणे व त्यातील दोषांचे निराकरण करणे, हा “संस्कारांचा पाया”असतो. म्हणूनच हिंदूधर्मात आई, वडील,गुरु अथवा पूर्वजांनी सोळा संस्कारांची योजना केली आहे. या संस्कारतून मनुष्याला निसर्गातील चेतनेशी जोडले जाते.त्याला त्याच्या उन्नतीचा मार्ग ह्या संस्कारांमुळेच सापडतो. ‘उन्नतव्यक्ती’ ‘चांगला समाज’ आणि ‘प्रगतराष्ट्र’ निर्माण करतात.

 सोळा-संस्कार हिंदू धर्मातील

व्यक्तीवर साधारणपणे आई-वडील, कुटुंब, कुटुंबातील इतर व्यक्ती आणि गुरु हे संस्कार करतात. म्हणूनच आवश्यक असे सोळा संस्कार आपल्या वैदिक धर्मात सांगितले आहे. याशिवाय आणखी सुद्धा अनेक संस्कार आहे परंतु त्याचा उल्लेख आपण इथे केलेला नाही.

1.गर्भाधान संस्कार किंवा गर्भसंस्कार

जेव्हा बाळ गर्भ स्वरूपात असतो तेव्हा हा संस्कार केला जातो.- या संस्काराला,ऋतुशांती संस्कार असेही म्हणतात. लग्नानंतर विवाहित जोडप्यांनी “चांगली संतती” समाजाला द्यावी. हा या संस्कारा मागचा उद्देश आहे. हा संस्कार करताना सर्वप्रथम संकल्प केला जातो. त्यानंतर गणपती पूजन, पुण्यहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, होम(यज्ञ) करून दुर्वांचा रस स्त्रियांच्या उजव्या नाकपुडीत सोडला जातो.विवाह नंतर स्त्रीला पहिल्यांदा रजोदर्शन झाल्यानंतर पहिल्या 16 रात्री हा संस्कार केला जातो. याकरता सुद्धा अनेक नियम वेदांमध्ये सांगितलेले आहेत उत्तम प्रजेची निर्मिती करण्याच्या दृष्टीने स्त्रीवर हे संस्कार केले जातात या संस्कार करतांना मुहूर्त बघितला जातो.

2. पुसवन संस्कार

गर्भसंस्कार झाला की गर्भधारणा काही काळानंतर होते. म्हणजे गर्भधारणा झाली की लगेच पुसवन संस्कार केला जातो. गर्भातील बाळ सशक्त व निरोगी असावे यासाठी गर्भधारणेनंतर तिसऱ्या महिन्यात हा संस्कार केला जातो. शुद्ध एकादशी पाहून वद्य पंचमी पर्यंत मधली एखादी रिक्त तिथी सोडून हा संस्कार करता येतो. पुष्य किंवा श्रवण नक्षत्रावर हा संस्कार करता येतो. बुधवार, गुरुवार किंवा शुक्रवारी हा संस्कार साधारणपणे केला जातो.

3. अनवलोभन संस्कार

र्भधारणा झाली की हा संस्कार करतात. या यामध्ये गरोदर मुलीच्या हाताने दुर्वांना सहाणेवर वाटले जाते. व त्याचे गोळी केली जाते. त्यानंतर पूर्वेकडे तोंड करून गर्भवती स्त्रीला बसवल्या जाते व तिच्या मागून एका स्वच्छ वस्त्रातून त्या दुर्वाचा रस तिच्या उजव्या नाकपुडीत सोडला जातो. मानवाची हि नाकपुडी पिंगला नाडी सोबत जोडलेली असते. बहुतेक कार्याचे वरिष्ठ उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पिंगळा नाडी कार्यरत होणे आवश्यक असते असे मानले जाते.

4.सीमांतोन्नयन संस्कार:—

—————————- गर्भवती महिलेचे पूजन या संस्कारात करतात. या संस्कारामध्ये पति स्त्रीच्या पश्र्चिम बाजूस पूर्वेकडे तोंड करून उभा राहतो. या संस्काराचा उद्देश असा आहे की एकदा स्त्री ने गर्भधारणा केली की, त्या स्त्रीच्या गर्भाचे रक्षण केले जावे. तिचा गर्भपात होऊ नये. याकरता पती तिचा भांग भरतो. उंबराचे घोस्ट, साळी, जनावरांचे काटे, आणि तीन दर्भाचे कावळे घेऊन स्त्रीचे चार वेळा केस विंचुरून बांधतात.

5. जातक कर्म:—

———————- हा संस्कार बाळाच्या जन्मानंतरचा पहिला संस्कार आहे व सोळा संस्कारांमधील पाचवा संस्कार. या संस्कारांमध्ये बाळाचा जन्म झाल्यावर आई-वडील सगळेजण आनंद दर्शवतात व वडील बाळाच्या कानामध्ये मंत्राचा जप करतात. म्हणजे बाळ जन्माला आल्यावर त्याला सकारात्मक दिशा दाखवण्याचे हे कर्म आहे. बाळाच्या ओठांना मधाचे चाटण लावले जाते बऱ्याच ठिकाणी बाळाच्या जिभेवर मधाने ओम हे शुभचिन्ह काढतात.

6. नामकरण संस्कार

  या संस्कारातून बाळाला नाव देण्यात येते. जन्म झाल्यावर पासून मुलाला बाराव्या दिवशी व मुलीला तेराव्या दिवशी पाळण्यात ठेवतात. त्याला नामकरण संस्कार असे म्हणतात. किंवा बऱ्याच ठिकाणी त्याला “बारसे” असे सुद्धा बोली भाषेत म्हणतात. हा दिवस खूप शुभ असतो. याच दिवशी हिंदू संस्काराप्रमाणे मुलाचे व मुलीचे कान टोचले जातात. या दिवसाच्या व्यतिरिक्त बारसे करायचे असल्यास शुभवार व तिथी बघितली जाते. त्यासाठी आधी “संकल्प” केला जातो मग “गणपती पूजन” केले जाते. पुण्यहवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध करून,तांदळाच्या राशीवर बाळाचे नाव लिहिले जाते.

7. सूर्यावलोकन

सोळा संस्कारांपैकी हा सातवा संस्कार आहे. यात बाळाला घराबाहेर घेऊन जाण्याचा संस्कार आहे. बालक/ बालिका जन्माला आल्यानंतर ते आपल्या आईसह अंधाऱ्या खोलीमध्येच पूर्वी असायचे. त्यामुळे त्याला सूर्याचे तेज व प्रकाश दाखवण्यासाठी, उजेडाचा अनुभव घेण्यासाठी, ‘सूर्यदर्शन’ करावयाचा असा हा संस्कारात आहे. याला सूर्यावलोकन सोहळा असे म्हणतात.

8.निष्कमण

या संस्कारामध्ये लहान बाळाला पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची ज्योती दाखवली जाते. चंद्राची शितलता बाळाला दाखवून त्याचे तेज बाळामध्ये यावे असा हा संस्काराचा हेतू आहे. या संस्कारात बाळाला रात्रीच्या जगाचे दर्शन घडवणे हा उद्देश असतो. रात्र काय आहे हे सुद्धा त्याला कळतं! अंधार पडतो म्हणजे काय! चंद्राचा उजेड म्हणजे काय हे कळते.

9. अन्नप्राशन

सोळा संस्कारापैकी हा नववा संस्कार आहे. जन्म झाल्यापासून बाळ दूधच पीत असते. परंतु हळूहळू त्याला अन्नाची सवय व्हावी म्हणून बाराव्या महिन्यात हा संस्कार केला जातो. यात पहिल्यांदा बाळाला अन्न खाऊ घालतात. यावेळी अन्नपूर्णा मातेची पूजा व इतर देवतांची पूजा केल्यानंतर दही, दूध, तूप यांनी युक्त असे अन्न यांना बाळाला खाऊ घालतात. यावेळी होम सुद्धा काही काही घरांमध्ये करतात. गृहसूत्र या ग्रंथामध्ये या संस्काराची माहिती दिली आहे. मुलांना अन्नाचा घास भरून झाला की त्याच्या समोर वस्त्र, शास्त्र, ग्रंथ अशा अनेक वस्तू ठेवल्या जातात. पहिल्यांदा ज्या वस्तूला स्पर्श करेल तेच तो चरित्रासाठी वापरले असा समाज आहे. या संस्कारातून बाळाला तेच मिळेल असा हेतू असतो.

10. वर्धापन

जन्म झाल्यापासून एक सौर वर्ष पूर्ण झाल्यावर बालकाचा वाढदिवस साजरा केला जातो. यालाच वर्धापन दिन असे म्हणतात. हा दहावा संस्कार आहे. वर्धापन हा तिथीनुसार साजरा केला जातो. पण आजकाल इंग्रजी महिन्याच्या तारखांप्रमाणे वाढदिवस साजरा केला जातो. जन्म नक्षत्राच्या दिवशीच हा वाढदिवस साजरा केला जावा असा संस्कार, वर्धापन दिनाचा आहे.

11. चुडाकर्म

चुडा कर्मा हा अकरावा संस्कार आहे. केसांच्या खाली मनुष्याच्या डोक्यावर सहस्त्राकार चक्र असते. तिथे शेंडी ठेवून बाकीचे केस काढणे याला चुडा-कर्म किंवा चौलकर्म असे म्हणतात. “चुडा” म्हणजे “शेंडी”. याला मुंडन संस्कार असेही म्हणतात. हा संस्कार एक वर्ष वय, तीन वर्ष वय अथवा बाळाच्या पाचव्या वर्षी हा संस्कार करता येतो. जन्म झाल्यावर आईच्या पोटात बाळाचे जे केस उगवलेले असतात, ते काढणे म्हणजेच चुडा करणे होय. या कर्माच्या वेळी वैदिक मंत्रोच्चार केले जातात. मुलांच्या आयुष्यात बल आणि तेज वृद्धी व्हावी म्हणून हा संस्कार केला जातो. ब्रम्हांडातील “सत्व-लहरी” शेंडीं द्वारे शरीरात प्रवेश करून सत्वगुण वाढवणे, हा या संस्काराचा उद्देश आहे.

12. अक्षरा अक्षरारंभ

सोळा संस्कारांपैकी हा अत्यंत महत्त्वाचा असा बारावा संस्कार आहे. यामध्ये वयाच्या पाचव्या किंवा सहाव्या वर्षी बालक-बालिकेला अक्षर ओळख, करून विद्या ग्रहण करण्याचा आरंभ केला जातो. अक्षर पाटीवर गिरवून, वाचन, लेखन इत्यादी गोष्टी शिकविल्या जातात. योग्य दिवशी, अयोग्य वारी, शुभ तिथीला, अक्षर आरंभ केले जाते.श्रींगणपती,श्रींविष्णू ,श्रीलक्ष्मी, श्रीसरस्वती, श्रीगुरूदेव व ब्राह्मण यांना वंदन करून सुरुवातीला ओम अक्षर काढले जाते. प्रथम शिकविले जाते. त्यानंतर “श्रीगणेशा” हे शिकवून बाकी अक्षर ओळख करून देऊन अक्षर गिरविले जातात. म्हणजे आपल्याला शाळेत टाकतात तेव्हा हा संस्कार आजकाल घरीच करतात. कारण “गुरुकुल” पद्धती फारच कमी झालेली आहे.

13. उपनयन संस्कार

16 संस्कारांपैकी हा 13 वा संस्कार आहे. कुमार वयाच्या मुलांसाठी हा संस्कार आहे. यामध्ये मुलाला “जनेऊ” घालण्याचा संस्कार केला जातो. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य समाजातील मुलांसाठी हा संस्कार सांगितला आहे या संस्कारात मुलांचे केस काढून त्याची शेंडी वाढवितात. या संस्कारानंतर बालक आपल्या पालकांपासून दूर होऊन गुरूकडे विद्या शिकायला जाते. यांना पवित धारण करणे हा या संस्काराचा मुख्य भाग मांडला जातो. या संस्कारामध्ये बटूला इंद्रिय निग्रह शिकवला जातो. उपनयन अथवा मुंज झालेल्या मुलाला द्विज असे म्हणतात. त्याचा हा दुसरा जन्म मानला जातो. पहिला जन्म आई-वडिलांपासून तर दुसरा जन्म गायत्री मंत्रापासून झाला असे म्हणतात. ब्राह्मणांमध्ये आठव्या वर्षी क्षत्रीयांमध्ये अकराव्या वर्षी, तर वैश्य लोकांमध्ये 12 व्या वर्षी उपनयन केले जाते. उपनयन झाले की त्या कुमाराला शिकावे लागते व ब्रह्मचर्य पाळावे लागते. यात गुरुगृही राहून शिक्षण घ्यावे लागते. ब्राह्मण मुले वेदांचा अभ्यास करतात.

14. समावर्तन

हिंदू धर्मातील हा चौदावा संस्कार आहे. उपनयन झाल्यानंतर हा करतात. म्हणजेच मुंज झाल्यानंतर, याला सोडमुंज असेही म्हणतात. पूर्वीच्या काळी गुरुकुलातून बाहेर पडताना सोडमुंज केली जायची. यावेळी गुरूला दक्षिणा देतात.यावेळी गुरू शिष्याला गृहस्थाश्रम संबंधात उपदेश करत असतात. गृहस्थाश्रमाचे महत्व व गृहस्थाश्रमाची जबाबदारी बद्दल समजावून सांगतात. म्हणजे शिक्षण पूर्ण करून गुरूकडून गृहस्थाश्रमाकडे जाण्याचा हा संस्कार आहे

15. विवाह

हिंदू धर्मात विवाहाला फार महत्त्व आहे. विवाह हा सोला संस्कारांमध्ये पंधरावा संस्कार आहे. हा लग्नाचा संस्कार प्रत्येकाच्या जीवनात व समाजातही फार महत्त्वाचा आहे. या संस्कारात उपवर वधू आणि वर यांचे ब्राह्मण,अग्नी, नातलग, मित्रमंडळी व समाजातील इतर व्यक्ती यांच्या साक्षीने विवाहाची गाठ बांधली जाते. यालाच ‘पाणी-ग्रहण’ असेही म्हणतात. हे एक सामाजिक, धार्मिक, आर्थिक, कौटुंबिक, वैयक्तिक बंधन आहे. विवाह हा संतती अथवा वंश पुढे नेण्यासाठी असलेला सामाजिक व कायदेशीरमार्ग असलेला संस्कार आहे. विवाहामध्ये वधू आणि वर “सप्तपदी” घालून आपले नातेदृढ करतात. वधू ही वराच्या घरी गृहलक्ष्मी म्हणून प्रवेश करते व वंशातील वेल पुढे नेते.

16. अंत्येष्टी

सोळा संस्कारांपैकी हा शेवटचा संस्कार आहे. यावेळी मनुष्य जीवन संपलेले असते. कारण हा माणसाच्या मृत्यूनंतर केला जाणारा संस्कार आहे. याला दाहकर्म किंवा अंत्यष्टी असेही म्हणतात. यामध्ये दिवंगता विषयी आस्था व सद्भावना या विधी- संस्कारा मधून व्यक्त केल्या जातात. भारतीय तत्त्वज्ञानानुसार शेवटच्या क्षणी व्यक्ती जो विचार करतो तोच जन्म त्याला पुढचा मिळतो. असा आपल्या संस्कृतीमध्ये समज आहे. म्हणून परमेश्वराचे अखंड नामस्मरण करावे असे वैदिक संस्कृती सांगते.

      हिंदू धर्मातील हे सोळा संस्कार म्हणजे एक प्रकारची साधना आहे. कुटुंब व समाज सुस्थितीत राहण्याची व्यवस्था आहे. हे संस्कार त्या व्यक्तीवर आई-वडील आणि गुरूकडून केले जातात. संस्कारांमुळे होणारी अध्यात्मिक उन्नती व्यक्तीला लाभप्रत ठरते. व्यक्ती सर्वांगीण समृद्धी मिळवू शकतो. समाजाच्या आध्यात्मिक उत्क्रांतीतही योगदान देऊ शकतो. यामुळे समाज समृद्ध व मजबूत होतो. सक्षम होतो. त्यामुळे राष्ट्राच्या समृद्धीला हातभार लागतो. जन्मापासून ते मृत्यूपर्यंचे असे हे “सोळा-संस्कार” हिंदू धर्मात प्रचलित आहेत. वय-काल आणि परिस्थितीनुसारही आजही योग्य आहेत. म्हणूनच आपल्या वैदिक हिंदू  धर्मातील या संस्कारांना अतिशय महत्त्व आहे.    


Spread the love

Leave a Comment

Recommended
आओ फिर से दिया जलाएँ भरी दुपहरी में अंधियारा सूरज…
Cresta Posts Box by CP
Index