1 मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस

Spread the love

1 मे महाराष्ट्र दिवस:

आपल्या सगळ्यांना माहीतच आहे 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा अनेकांचे म्हणणे होते की, भारतात विविध भाषा असल्यामुळे,भाषे प्रमाणे प्रांत रचना करण्यात यावी.आपले महाराष्ट्र हे मूळ नाव “मराठा” या शब्दाचा अपभ्रंश झालेले रूप आहे. म्हणजेच,मराठी भाषिक लोकांचा देश असा अर्थ होतो. काही विद्वानांच्या मते महाराष्ट्र हे मूळ नाव नाही,तर ते “महाराठ्ठ” या संस्कृत शब्दाचे रूप आहे. याचा पण अर्थ असा होतो की मराठी भाषिक लोकांचा देश.

            राष्ट्र हा शब्द “राज्य” “प्रांत” म्हणूनही वापरला जातो. तर भाषाविज्ञानातील तज्ञांच्या मते महा आणि राष्ट्रीय यांच्या संयोगातून “महाराष्ट्र” हा शब्द निर्माण झाला.शिवाय यांची भाषा सुद्धा मराठी होती.

मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या:

महाराष्ट्र हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे. अंदाजे8,40,00,000 मराठी लोक मराठी बोलतात.हे मराठी म्हणून त्यांची मातृभाषा बोलतात.

त्यामुळे भाषेप्रमाणे मुंबई राज्याचे दोन भाग झाले. मराठी आणि कोकणी भाषकांचे माहेरघर असलेले महाराष्ट्र आणि गुजराती लोकांचे गुजराती भाषा व कच्छभाषा माहेरघर म्हणजे गुजराती भाषा. अशाप्रकारे गुजरात प्रांत सुद्धा एक मे 1960 रोजी स्वातंत्रपणे अस्तित्वात आला. म्हणून गुजरात व महाराष्ट्र दोन्ही ठिकाणी आपापल्या निर्मितीचा दिवस म्हणजे 1 मे ला साजरा केला जातो.अशाप्रकारे 1 मे 1960 रोजी झालेल्या, मुंबई राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र दिन, हा सर्व मराठी बांधव साजरा करतात. हा दिवस महाराष्ट्रातील लोक मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतात.कारण तो त्यांच्या “सांस्कृतिक” जीवनाची ओळख दर्शवतो. महाराष्ट्रातील जनतेच्या “स्वातंत्र्याचेप्रतीक” म्हणून 1 मे हा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्राला उज्वल परंपरा लाभलेली आहे.

आंतरराष्ट्रीय कामगार दिवस:

                      तसेच 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस असतो. आपले सामाजिक जीवन हे कामगारांच्या मेहनतीवर अवलंबून आहे. हा दिवस म्हणजे समाजासाठी कामगारांच्या योगदानाचा दिवस आहे. जागतिक उत्सव आहे. त्याची सुरुवात 19 व्या शतकातच शतकाच्या उत्तरार्धात झाली. आणि आता जगभरात अनेक देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी देण्यात येते. अशाप्रकारे हा दिवस सार्वजनिक उत्साहाचा आहे. हा दिवस जगभर साजरा केला जातो.

कामगार दिवस का साजरा करतात?

    आपल्या भारत देशाच्या विकासात आणि वाढीमध्ये कामगारांनी फार मेहनत घेतलेली आहे. सर्व कामगारांनी त्यांच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी बांधकाम, उत्पादन, शेती, औद्योगिक क्षेत्र, कारखाने व इतर अनेक सेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये स्वकष्टाने योगदान दिलेले आहे. तथापि अनेक कामगारांना अजूनही कमी वेतनात काम करावे लागते. बऱ्याच ठिकाणी कामगारांच्या अनाडीपणाचा फायदा घेण्यात येतो. शारीरिक इजा किंवा अपघात झाल्यास मदत मिळत नाही. स्त्रियांना सुद्धा बऱ्याच ठिकाणी अर्धे वेतन देण्यात येते.तसेच काम करताना अनेक “कठीण” परिस्थितीतून त्यांना कामे करावे लागतै. अवजड व कठीण कामांमध्ये असुरक्षितता हे ठरलेलेच आहे. तेव्हा संरक्षणाचा अभाव यासारख्या आव्हानाला त्यांना नेहमीच सामोरे जावे लागते. या गोष्टींची जाणीव सर्वांना व्हावी व शासनाला सुद्धा व्हावी ही अपेक्षा या दिवशी  कामगारांची असते.

                महाराष्ट्रामध्ये कोकण एनजीओ ही एक ‘ना नफा ना तोटा’ अशा प्रकारे काम करणारी एक संस्था आहे. ही संस्था महाराष्ट्रातील उपेक्षित समुदायांसाठी शाश्वत उपजीविका निर्माण करण्यावर लक्ष देत असते. तसेच कामगारांना प्रशिक्षण देणे, प्रशिक्षित करणे, शिक्षण देणे आणि इतरही मदत प्रदान करणे यासारखे कार्य करत असते. महाराष्ट्रातील उपेक्षित समुदायासाठी शाश्वत उपजीविका निर्माण करण्यावर या संस्थेने लक्ष केंद्रित केलेले आहे.

            कामगारांना चांगले जीवन मिळणे आवश्यक आहे. कारण हे त्यांच्या कार्याला न्याय धरूनच आहे. कामगारांचे जीवन सक्षम असेल तर ते समाजाच्या हिताचे ठरते. कामगारांचे जीवन सुधारण्यासाठी कोकण एनजीओ सारख्या संस्था नेहमी कार्यरत असतात.कामगारांच्या कष्टांमुळेच समाजातील अनेक कार्य पूर्णत्वाला जातात. तेव्हा आपण जगातील सर्व कामगारांसाठी समतापूर्ण आणि न्याय पूर्ण वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल व त्यांच्या संघर्षमय कष्टमय जीवनात आनंद निर्माण होईल. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे!


Spread the love

Leave a Comment

Recommended
अक्षय तृतीया ही तिथी विशेष का आहे? हिंदू धर्मात या…
Cresta Posts Box by CP
Index