शुद्ध विचार
स्वहस्ताक्षरात माला स्वहस्तघृष्ट चन्दनम।
स्वहस्तलिखितं स्तोत्र शक्रस्यापि श्रियंहरेत्।।
भावार्थ:
या श्लोकाचा अर्थ असा की, जर सामान्य व्यक्तीने सुद्धा नीतीशास्त्राच्या विचारांचे पालन आपल्या जीवनात केले, तर तो सफल होऊन शकतो. सर्वसाधारण उपायांनी सुद्धा इंद्राची संपत्ती स्वतः वश मध्ये करू शकतो. यासाठी व्यक्तीला ईश्वराला शरण जाणे आवश्यक आहे. रोज स्नान ध्यान करून सर्वप्रथम सूर्यदेवाला जलाचे अर्ध द्यावे. एक संपूर्ण जपमाळ भगवान नारायणासाठी जप करावा. चंदन घासून, प्रभूला अर्पण करावे. मग स्वतः पण आपल्या माथ्याला आणि गळ्याला लावावे. व शेवटी वरील श्लोकाचा मंत्र लिहून श्रवण करावा. यामुळे सुख, सौभाग्य आणि धन यामध्ये अपार वृद्धी होते.
Table of Contents
Toggleजीव स्वास्थ्य
शरीरमेवायतनं सुखस्य दु:ख्याल चाप्यायतनं शरीरम्।
यद्यत् शरीरात क्रोधित कर्म तेनैव देही सुपात्र तत्।।
भावार्थ:
या श्लोकाचा अर्थ असा की, स्वास्थ्यरुपी सुखाचे अधिष्ठान आपले शरीर आहे. आणि दुःखरुपी रोगाचे अधिष्ठानही शरीरच आहे. जीव शरीराच्या माध्यमातून जी कामे करतो, त्यानेच आरोग्य राखले जाते. अथवा त्याला रोग प्राप्त होतात.