महात्मा ज्योतिबा फुले ll Mahatma Jyotiba Phule

Spread the love

महात्मा ज्योतिबा फुले:

( Mahatma Jyotirao Phule ): भारतीय समाज सुधारकांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांच्या जीवनाबद्दल आपण आता माहीती करून घेऊ या. त्यांचे संपूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई असे होते. ज्योतिबांचे आजोबा श्रीशेरीबा गो-हे माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे कामकाज करत असत. यावर पेशव्यांनी त्यांना 35 एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली होती. त्यानंतर फुलांच्या व्यवसायामुळे गो-हे घराण्याला फुले ह्याच नावाने समाजात ओळखल्या जाऊ लागले. आजोबांच्या मृत्यूनंतर ज्योतिबांचे काका राणोजींनी सदरील पस्तीस एकर जमीन हडप केली यामुळे नंतर ज्योतिबांचे वडील गोविंदराव हे भाजीपाल्याचा व्यवसाय करू लागले त्यांचे मूळ गाव गट गुण तालुका खटाव जिल्हा सातारा हे होते 

               महात्मा फुले हे सुधारणावादी विचारांचे होते. त्यांनी “सत्यशोधक-समाज” नावाची संस्था स्थापन केली. त्यांनी देश व समाजासाठी लेखक, विचारवंत व समाज सुधारक असे अश्या तिहेरी भूमिका त्यांनी देशासाठी तळमळीने पार पाडली. प्रामुख्याने शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची त्यांनी सर्वांसमोर मांडणी केली आणि स्त्री शिक्षणाचा पुढाकार त्यांनी घेतला.त्याकाळातील स्त्रियांची “अगतिकता”त्यांना बघितली जात नव्हती.त्या काळात स्त्रियांना शिक्षण दिले जात नव्हते घरात व समाजात कोणत्याही महत्त्वाच्या क्षेत्रात त्यांचे “मत” “निर्णय” विचारले जात नसे. घरोघरी पुरुषशाही होती. समाजात बालविवाह प्रथा होती. नशिबाने जर ती मुलगी विधवा झाली बालवयात तर तिला दुसरा विवाह करता येत नसे किंवा सती जावे लागे असे. अशी भयानक सामाजिक स्थिती त्या काळात स्त्रिया व मुलींची होत. 

          . ज्योतिराव केवळ नऊ महिन्याचे होते तेव्हाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्याकाळी बालविवाह प्रथा असल्यामुळे त्यांचाही विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्या सोबत झाला. ते साल होते 1840. त्यांना शिक्षणाची आवड होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथील पंतोजींच्या शाळेत मराठी माध्यमातून झाले यानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. पुढे काळाची गरज म्हणून त्यांनी आपल्या पत्नीलाही शिकविले. इसवी सन 1842 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात त्यांनी प्रवेश घेतला. त्यांची बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.महात्मा ज्योतिबा फुले यांना मराठी, इंग्रजी, उर्दू ,कन्नड, तामिळ, गुजराती इत्यादी विविध भाषा येत होत्या. महात्मा फुलेंवर थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन एन्ट्री कॉमन सेन्स ऑफ रीजन या पुस्तकांचाही प्रभाव पडला त्यांनी अनेक पुस्तके वाचली व लिहिलीत सुद्धा. भारतीय समाजातील अज्ञान, दारिद्र्य व जातिभेद पाहून त्यांनी समाज सुधारण्याचा निर्णय घेतला हा निर्णय क्रांतिकारक होता.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक कार्य:

1. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 3ऑगस्ट1948 रोजी पुण्यातील बुधवारपेठ येथे “तात्यासाहेब भिडे” यांच्या वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. पहिल्या दिवशी या शाळेत आठ मुली उपस्थित होत्या.या शाळेची शिक्षिका व मुख्याध्यापिका त्यांची पत्नी सावित्रीबाई या होत्या.शाळासुरू करण्याच्या काही काळ आधी त्यांनी स्वतःच्या पत्नीला घरीच शिकवून साक्षर बनविले. ज्योतिबांनी सावित्रीबाईंना पहिली स्त्री शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्याध्यापक बनविले. स्त्री शिक्षणाचे कार्य जरी “पवित्र” होते. तरी पण ते लोकांच्या पचनी पडत नव्हते.त्यामुळे त्यांना पत्नीसोबत गृहत्याग करावा लागला. 

2. त्यांची सहनशक्ती अचाट होती. त्यामुळे सत्कार्यात होत असलेला विरोध न जुमानता त्यांनी परत चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा 3 जुलै 1850 मध्ये सुरू केली. तर पुढे 17 सप्टेंबर 1851 रोजी रास्ता पेठेत तिसरी शाळा स्थापन केली. यानंतर परत 15 मार्च 1852 रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची अजून एक शाळा सुरू केली. 1852  नेटिव्ह फिमेल स्कूल सभा “पुनालायब्ररी”ची स्थापना केली.अशाप्रकारे अत्यंतकडक विरोधातही त्यांचे कार्य अविरत सुरू होते. त्यांचे कार्य पाहून समाजात आता सुधारणा होऊ लागल्या विरोधक कमी होऊ लागले.

3. शूद्रांसाठी शिक्षणाच्या कार्यामुळे त्यांना भरपूर विरोध झाला. त्या काळात स्त्रीला सुद्धा शूद्रांसारखीच वागणूक मिळत होती. तेव्हा ते पुण्यातील गंजपेठ येथील उस्मान शेख यांच्या वाड्यात मुक्कामाला राहायला गेले. शाळेत जाताना रस्त्यात लोक त्यांच्या पत्नीच्या अंगावर दगड,  शेण, माती फेकत व चिडवत. अशा प्रकारे समाज सुधारण्यासाठी दोघाही पती-पत्नींना फार त्रास सहन करावा लागला. तेव्हा कुठे आजचे हे स्त्री शिक्षण दिसून येत आहे.

4. 19 मे 1852 रोजी महात्मा फुले यांनी वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी पहिली भारतीय शाळा सुरू केली. त्यावेळी धुराजी चांभार व गणू शिवाजी मांग हे दलित शिक्षक शाळेमध्ये अध्यापनासाठी नेमलेत.यावेळी त्यांचे सहकारी सदाशिव गोवंडे सखाराम परांजपे, विठ्ठल वाळवेकर, वामन प्रभाकर भावे, विनायक भंडारकर यांनी त्यांना मोलाची मदत केली

5. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या महान व महत्त्वपूर्ण कार्याबद्दल पुणे विद्यापीठाचे सध्याचे डेक्कन कॉलेज प्राध्यापक मेजर थॉमस कॅडी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात सरकारी विद्या खात्याकडून ज्योतिबांचा जाहीर रीतीने सत्कार करण्यात आला

6. 1882 साली भारतातील शिक्षण विषयक स्थापन करण्यात आलेल्या हंटर कम्युनिस्ट कमिशन कमिशन समोर फुलांनी साक्ष देऊन बारा वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे. शिक्षक प्रशिक्षित असावे शिक्षक बहुजनातील असावे, जीव नको योगी व्यवहारिक शिक्षण द्यावे असे ठरवले.आदिवासी जाती जमातींना शिक्षणात शिक्षणात प्राधान्य शेतीचे व तांत्रिक शिक्षण द्यावे वसूल केलेल्या शेतकऱ्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या शिक्षणावर खर्च करावे. महाविद्यालयीन शिक्षण जीवनातील गरजा भागविणारे असावे अशा महत्त्वपूर्ण मागण्या केल्या अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले हे आशिया खंडातील पहिले शिक्षण तज्ञ होते.

विद्याविना मती गेलीl
मतीविना नीती गेलीll
नितीविना गती गेलीl
गती विना, वित्त गेलेll
वित्तविनाश शूद्र खचलेl
इतके अनार्थ एका अविद्याने केलेll

लेखक: महात्मा ज्योतिबा फुले
अशी महान शिकवण त्यांनी आपल्याला दिली.


Spread the love

Leave a Comment

Recommended
श्री भगवान महावीर.  जैन धर्मामध्ये अहिंसेचे फार महत्त्व आहे. जैन…
Cresta Posts Box by CP
Index